पलूस कडेगांव मध्ये काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली : शेतकरी नेते नारायण वाघमोडे
विद्यमान आमदार आता निवडणुकीपुरते दारोदारी फिरत आहेत पण गेले पाच वर्षात त्यांनी कडेगाव आणि पलूस तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदाही तहसीलदार कार्यालयात आमसभा घेतली नाही. तालुक्यातील प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार किंवा आमसभा तहसील कार्यालयात घेण्याची पद्धत आहे.लोकशाही मध्ये पारदर्शक कारभारासाठी हेच अपेक्षित आहे. हुकूमशाही पद्धतीने लोकांना त्रास देणे, लोकांना ऊसतोडी देणेसाठी पक्ष प्रवेशाची बंधने घालणे, लोकांच्या उसाची काटामारी करणे, वजन करून आणलेला ऊस खाली करून घेणार नाही अशा धमक्या देणे या गोष्टीला लोकं आता वैतागली असून या अघोषित गुलामगिरीच्या बेड्या तोडून स्वाभिमानाने भाजपाला मतदान करणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे संग्रामभाऊ देशमुख यांचा विजय निश्चितपणे होणार आहे असे नारायण वाघमोडे म्हणाले. यावेळी विविध गावातील शेतकरी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित राहून प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. यावेळी मंचकावर उमेदवार संग्राम देशमुख, शिवसेना कडेगांव तालुकाप्रमुख प्रदीप कदम, युवा नेते विश्वतेज देशमुख आदी.