Sanvad News साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने सांगली जिल्हास्तरीय राष्ट्रभक्तीपर काव्यलेखन स्पर्धा

साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने सांगली जिल्हास्तरीय राष्ट्रभक्तीपर काव्यलेखन स्पर्धा


भिलवडी –पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राचे वतिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वलिखित काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिली आहे.
या स्पर्धा इयत्ता ७ वी ते ९ वी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा असून स्पर्धेसाठी माझा देश ,भारतीय जवान ,पर्यावरण ,वृक्षारोपण , व्यसनमुक्ती ,तिरंगा झेंडा असे विषय आहेत. हा विषय सोडून राष्ट्रीय एकात्मता ,समाजसेवक , महापुरुष याही विषयावर कविता लेखन करता येईल.

 विद्यार्थ्यांनी कागदाच्या एका बाजूस कविता सुवाच्य अक्षरात लिहून कविते खाली आपले नाव ,शाळा,संपूर्ण पत्ता व संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.कविता स्वत: लिह्ल्याबद्दल मुख्याध्यापकांचे पत्र सोबत जोडावे सांगली जिल्ह्यातील इयत्ता ७ वी ते ९ वी तील विद्याथ्यानी बहुसंख्येणे सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुंदर पुस्तके भेट देण्यात येतील.

     विद्यार्थ्यांनी आपल्या कविता २६ जानेवारी २०२२ पर्यंत सुभाष कवडे सानेगुरुजी संस्कार केंद्र भिलवडी ता.पलूस जि.सांगली या पत्यावर पाठवाव्यात.

To Top