Sanvad News पलूसकर शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुण्यतिथी हुतात्मा दिन विविध उपक्रमांनी संपन्न.

पलूसकर शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी पुण्यतिथी हुतात्मा दिन विविध उपक्रमांनी संपन्न.



पंडीत विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी व  -हुतात्मा दिन विविध उपक्रमांनी साजरा  करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक  टी.जे.करांडे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. अलका बागल ,ज्युनिअर  विभाग प्रमुख ए.एस. चव्हाण ,दीपक सावंत  प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग ,ज्युनिअर विभाग सर्व शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.

     हुतात्मा दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये परिसर स्वच्छता,वृक्षारोपण, प्रार्थना भजन,व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी कु. प्रज्ञा दीपक सावंत ,सौ.पी.व्ही.नरुले मँडम यांनी अतिशय सुंदर भजने सादर केली. कस्तुरबा गांधी महात्मा गांधी यांच्या वेषातील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक टी.जे करांडे म्हणाले भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या  इतिहासात महात्मा गांधीजी नावाचे एक सोनेरी आहे . स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या विचारांतून जगाला प्रेरणा देणाऱ्या  गांधीजीनी आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजी केवळ राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच, याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली

  यावेळी बोलताना प्रा.बी.एन. पोतदार  म्हणाले गांधीजींनी सत्य अहिंसा प्रेम स्वच्छता स्वावलंबन स्वदेशी या विचारांचा पाईक म्हणून त्यानी आपला जीवन मार्ग अवलंबला. महात्मा गांधीजींच्या  साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सत्‌शील व निरिच्छ वृत्ती आणि स्पष्टवक्तेपणा यांमुळे अनेकांचा त्यांनी विश्वास संपादिला असे सांगितले.

  सूत्रसंचालन एस.एस. पुदाले यांनी आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.डी.चोपडे  यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक व  विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्ष उदय परांजपे  व उपाध्यक्ष विश्वास रावळ,सचिव जयंतीलाल शहा  व सर्व संचालक यांनी सर्व उपक्रमाचे कौतुक केले.

To Top