विद्यार्थ्यांच्या शालेय विकासात शिक्षकांची व पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. मुले संस्कारक्षम असतात, चांगले संस्कार होणेसाठी शिक्षकांनी पालकांनी जागरूक असायला हवे,सुसंस्काराची शिदोरी जीवन सुंदर बनवते असे प्रतिपादन पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे यांनी पलूस येथे केले.
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022- 23 मधील पहिला शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, उपाध्यक्ष विश्वास रावळ ,सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ, संजय परांजपे ,मुख्याध्यापक टी.जे.करांडे , सर्व शिक्षक ,पालक उपस्थित होते.
विभाग प्रमुख ए.के.बामणे यांनी स्वागत केले. स्वागत गीतानंतर गेल्या शैक्षणिक वर्षातील बी.डी.एस. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झालेला माजी विद्यार्थी प्रणव निलेश भागवत याचा सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
परीक्षा विभाग प्रमुख ए.जे सावंत,सांस्कृतिक विभाग प्रमुख बी एन पोतदार, क्रीडा विभाग प्रमुख एस.डी सावंत यांनी सर्व या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम ,स्पर्धा, परीक्षा नियोजन संबंधित सूचना दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, सचिव जयंतीलाल शहा ,मुख्याध्यापक टी.जे करांडे यांनी आपले मनोगतातून सर्व पालकांना ,शिक्षकांना मार्गदर्शन केले.सर्व पालकांच्या शंकांचे निरसन केले.
संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे पुढे म्हणाले विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक विकासासाठी विद्यार्थ्यांची संगत महत्त्वाची आहे. पालकांनी नेहमी शिक्षकांच्या संपर्कात रहावे.संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
सचिव जयंतीलाल शहा म्हणाले चालू शैक्षणिक वर्ष गुणवत्ता विकास वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. आनंददायी शिक्षण पद्धती ,करिअर मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे माहिती तंत्रज्ञान युगात नवनवीन क्षेत्रात वाढती स्पर्धा आहे मुलांची आवड बघून शिक्षण दिले पाहिजे,एकही विद्यार्थी अप्रगत रहाणार नाही यासाठी आपण सर्वानी सजग असायला हवे..
मुख्याध्यापक टी.जे करांडे सर म्हणाले यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा जीवनात खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांचा कल आणि गुणवत्ता बघून निर्णय घेणे आवश्यक आहे. शिक्षण पद्धतीत अमलाग्र बदल होत आहेत मूल्यमापन पद्धती बदलत आहेत याची जाणीव ठेवून पालकांनी आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे असे सांगितले.यावेळी सर्व शिक्षक पालक उपस्थित होते. सूञसंचालन ए.के.बामणे यांनी आभार ज्येष्ठ शिक्षक व्ही. एस गुरव मानले.