पलूस कडेगाव मतदारसंघात संग्राम देशमुख यांचा विजय निश्चित : माजी आमदार महांतेश कवठगीमठ; पलूस येथे विविध ठिकाणी बैठका
पलूस प्रतिनिधी :
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील लोकांचा प्रतिसाद पाहता संग्राम देशमुख यांचा मोठ्या फरकाने विजय निश्चित आहे, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार महांतेश कवठगीमठ यांनी व्यक्त केला. पलूस येथील बैठकीत ते बोलत होते.पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी पलूस शहरात विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.
उमेदवार संग्राम देशमुख, पलूसचे माजी ग्रामपंचायत सदस्य शशीकांत पाटील, चंद्रकांत पाटील, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसूगडे, रामानंद पाटील, पिंटू मोरे, सागर मगदूम, शिवसेना पलूस तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे, श्री शिवप्रतिष्ठानचे रोहित पाटील हे या दौऱ्यात सहभागी झाले होते.
महांतेश कवठगीमठ म्हणाले, जिथं जिथं काँग्रेसचे सरकार येतं तिथे तिथे विकासाची कोणतीही कामे होत नाहीत. कर्नाटक मध्ये काँग्रेसने सगळी वाट लावून ठेवली आहे. कोणतीही विकास कामे केली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारला दुसरा पर्याय नाही. महायुतीचे सरकारच लोकांच्या भल्याचा विचार करू शकते. महिलांसाठी काढलेली लाडकी बहीण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या सवलती, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना. आणि सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा. हे सत्यात उतरण्याचा काम फक्त महायुतीचे सरकार करू शकतं. पलूस कडेगाव मतदार संघातील वातावरण भाजपला अतिशय अनुकूल असून लोकांचा संग्राम देशमुख यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे या मतदारसंघात संग्राम देशमुख यांचा मोठ्या फरकाने विजय होणार आहे हे निश्चित आहे. या मतदार संघात काँग्रेसच्या आमदारांनी पूर्ण दुर्लक्ष केले असल्यामुळे लोकांच्यात नाराजी आहे. तसेच संग्राम देशमुख हे सर्व सामान्य लोकांच्यात मिसळणारे आणि विकासाला चालना देणारा नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांचाच विजय होणार आहे.